दुसऱ्यांच्या अडचणींचा कधीच आनंद घेऊ नका कारण ईश्वर आपल्याला तीच वस्तू भेट देतात ज्यात आपल्याला आनंद मिळत असतो.
एकदा एका शेठजवळ खूप पैसा अडका संपत्ती होती त्याला कशाचीच कमी नव्हती सेवेला भरपूर सारे नोकर-चाकर होते. अनेक कंपन्या होत्या सर्व काही व्यवस्थित चालू होते एकदा शेठ निवांत बसला असताना त्याच्या मनात विचार आला की आपण एवढे श्रीमंत आहोत तर चला मग आपली नेमकी एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात म्हणून त्यांनी आपल्या अकाउंटंटला बोलावून घेतले आणि सांगितले,
की माझी एकूण किती संपत्ती आहे ती तू मला सांगायचे आहेस त्यासाठी तुला सात दिवसांचा वेळ देत आहे.शेठचा अकाउंटंट सात दिवसानंतर त्यांच्याकडची असलेली एकूण सर्व मालमत्ता, त्यांच्या कंपनीतून मिळणारे उत्पन्न ,इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम यांची शेठला एकूण सर्व संपत्ती सांगितली,
आणि म्हटलं की शेठ तुम्हाला अजिबातही काळजी करण्याचं कारण नाही तुमची जेवढी संपत्ती आहे त्यावर तुमच्या येणाऱ्या जवळपास सात ते आठ पिढ्या काहीही काम न करता एकाच जागी बसून खातील, एवढं ऐकल्यावर कुणालाही आनंदच होईल परंतु शेवटच्या बाबतीत मात्र उलटेच घडले शेठ विचार करू लागला की,
आपल्याकडे फक्त सात ते आठ पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती आहे त्यानंतर येणाऱ्या नवव्या पिढीचं कसं होईल या विचाराने शेठ मात्र अस्वस्थ होऊन गेला आणि त्याचं आपलं नातवंडांसोबत खेळणं आपल्या बायकोसोबत प्रेमाने बोलणं बागेत इकडे तिकडे बागडणं चांगल्या गोष्टींचा आनंद घेणे सर्वच कमी झालं तो कुठेही गेला तरी त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार की आपल्या येणाऱ्या पिढीचं कसं होणार.
एकदा तो असाच विचार करत बसला असताना त्याला मंदिरात चालू असलेल्या प्रवचनाचा आवाज ऐकू आला आणि त्याला वाटले की या प्रवचन करणाऱ्या महाराजांकडून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून तो त्या महाराजांकडे गेला आणि त्याने त्या महाराजांना विचारले
नक्की वाचा: “जीवनातील सर्वात मोठा गुरु “
की महाराज माझ्याकडे सात आठ पिढ्यांना पुरेल एवढीच संपत्ती आहे परंतु त्यानंतर येणाऱ्या नवव्या पिढीचे कसं होईल या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नाहीये त्यावर साधू महाराजांनी शेठच्या या प्रश्नावर हासून म्हटले की याचं खूपच साधं आणि सोपं उत्तर आहे या शहराच्या बाहेर एक म्हातारी बाई राहत आहे तिच्याकडे कोणत्याच गोष्टी पुरेशा प्रमाणात नाहीये नीट कपडे नाहीये की नीट खायला नाहीये तर राहायला एक साधी छोटीशी झोपडी आहे तुम्हाला फक्त त्या झोपडीत जाऊन त्या म्हाताऱ्या बाईला अर्धा किलो गव्हाचे पीठ द्यायच आहे हे त्यावरचं निवारण आहे.
अशा प्रकारचा सोपा उपाय एकूण शेठ खूपच खुश झाला आणि जिथं अर्धा किलो पीठ द्यायला सांगितले तिथे तो 100 किलो पिठाचं पोत देण्यासाठी आपल्या सर्व नोकर चाकरांना सोबत घेऊन गेला तिथे गेल्यावर तो त्या म्हाताऱ्या बाईला म्हणाला की मी या शहरातला खूप मोठा दानशूर आणि सर्वात श्रीमंत माणूस आहे ,खूप मोठ-मोठ्या गोष्टी शेठ करत होता आणि मी आपणाला दान द्यायला आलो आहे त्याचा हा बडेजाव त्या म्हाताऱ्या बाईचा लगेच लक्षात आला त्याने तिला शंभर किलो पीठ घेण्याची विनंती केली,
नक्की वाचा:”वादळापूर्वीची तयारी”