जागतिक पातळीवरच्या अनेक मोठमोठ्या उद्योजकांची सुरुवात ही गॅरेजमधूनच झालेली आपल्याला दिसून येते. आणि ती आपल्यासाठी मोठी प्रेरणा बनते की कसं एक गॅरेज मध्ये काम करणाऱ्यांनी करोडोंची कंपनी उभी केली अशाच प्रकारे करोडोंची कंपनी उभी करणाऱ्या एका मराठी उद्योजकाबद्दल आज जाणून घेणार आहोत.
गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातली मुंबईतल्या एका गॅरेजमध्ये एक भालचंद्र नावाचा मुलगा काम करत होता मुलगा सांगली जिल्ह्यातल्या तासगावचा घरची परिस्थिती गरिबीची त्यामुळे शिक्षण सहावी नंतरच सोडलेलं.परंतु बाहेर काम करता करता व्यवहारज्ञान त्यांनी चांगल्या पद्धतीनं रुजवलं होत
त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९०३ ला तासगाव मध्ये झाला,त्याचं पूर्ण नाव ”भालचंद्र दिगंबर गरवारे” त्यांना सगळेच आबासाहेब म्हणायचे कसेतरी करून कुणाच्यातरी मदतीने ते मुंबईला आले ;खिशात एक दमडीही नव्हती किंवा गहाण ठेवावं असंही काही नव्हतं कसंबसं गॅरेजमध्ये त्यांनी गाडी रिपेरिंगच काम शिकून घेतलं काही दिवसांत ते यात पटाईत बनले ते तरबेज होतेच शिवाय त्यात त्यांच्या चिकाटीपणाची भर पडली होती आयुष्यभर ग्रीसमध्ये हात काळे करायचे नाहीत हे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवलं होते.गॅरेजमध्ये राहून त्यांना गाड्यांबद्दल सर्व माहिती झाली होती .
वयाच्या 17 व्या वर्षी गाड्यांच्या खरेदी विक्रीचे ते एजंट बनले त्यावेळी भारतात चारचाकी गाड्यांचा ट्रेंड चालू झाला होता ,अजूनही आपल्याकडे कार काही बनत नव्हत्या ,त्याकाळी पाश्चिमात्य देशामध्ये गाड्या बनवल्या जात होत्या परंतु आर्थिक परिस्थितीमुळे नव्या गाड्यांऐवजी जुन्या गाड्यांना जास्त मागणी होती . नम्रपणाने बोलणे आणि आणि अपार मेहनत करायची तयारी यामुळे अगदी थोड्याच दिवसात जुन्या गाड्यांच्या विक्री व्यवसायात त्यांनी जम बसवला आबासाहेबांनी गिरगाव येथे डेक्कन मोटर्सची स्थापना केली. गाड्या विकता विकता सोबत गाड्यांचे इतर भाग तसेच टायरचीदेखील विक्री सुरू केली.
प्रामाणिकपणा आणि देखभालीची खात्री यामुळे मोठ मोठ्या श्रीमंतांपासून राजकारण्यांपर्यंत अनेकजण गाडी घ्यायची तर आबासाहेबांकडे येऊ लागली, आबासाहेबांनी 1937 मध्ये गरवारे मोटर्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली.धंद्याने प्रचंड वेग घेतला पुढे पुढे महाराष्ट्रातले सर्व संस्थानिक राजे महाराजे अलिशान गाडी हे गरवारेंकडूनच घेत असत.
मुंबईत गुजराती, पारसी, मारवाडी उद्योगपतींचे वर्चस्व असलेल्या काळात पहिल्यांदाच एक मराठी माणूस आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने छाप पाडत होता. जॅग्वार आणि Lagonda सारख्या परदेशी बनावटीच्या गाड्या युरोपमधून आयात करणारे गरवारे यांना प्रत्यक्षात तिथे जाऊन तो बाजार पाहण्याची इच्छा होती, गरवारे यांचे नाव मुंबईत मोठे झालंच होतं पण आता इंग्लंडवारी सुद्धा करायची त्यांच्या डोक्यात आले होते एक वेळ मुंबईला येण्यासाठीही पैसे नसलेले आबासाहेब जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी लंडनला निघाले;
तो काळ दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील होता. हिटलरच्या जर्मनीचा जोर वाढला होता इंग्लंडची प्रत्येक क्षेत्रात पीछेहाट होत होती. धंदे बसले होते मोठी मंदी सुरू होती फक्त आणि फक्त मिलिटरीला पुरवठा करणारे कारखाने चालू होते मध्यमवर्गीय लोकं कंगाल व्हायला लागले होते मोठ्या प्रमाणात जुन्या गाड्या विक्रीला निघाल्या होत्या.
चाणाक्ष आबासाहेब गरवारे यांनी यातला फरक ओळखत जुन्या गाड्या तर घेतल्याच परंतु तिथल्या उद्योगपतींकडून कंपन्याही विकत घेतल्या अतिशय परवडणाऱ्या भावात हा व्यवहार झाला यात गरवारे यांनी प्रचंड नफा कमवला नफ्या पेक्षाही इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेल्या एका भारतीय उद्योगपतीने त्यांच्या देशात येऊन त्यांच्याच कंपन्या विकत घेतल्या हे चित्र पहिल्यांदाच दिसत होतं.
नंतर आबासाहेब प्लास्टिक उद्योगातही उतरले ,प्लास्टिकचा मानवी जीवनात म्हणावा तेवढा प्रवेश झाला नव्हता दूरदृष्टीच्या आबासाहेबांनी यातही आपलं व्यवसाय कौशल्य सिद्ध केलं आणि प्लास्टिक उद्योग एक दूरगामी उद्योग म्हणून ठरवला.
(ABASAHEB GARWARE COLLEGE/PHOTO CREDIT:GOOGLE)
दुसऱ्या महायुद्धात नौदलासाठी लागणारी प्लास्टिकची बटणं तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली यात त्यांना प्रचंड फायदा झाला परंतु यात ते न थांबता त्यांनी याच उद्योगाचा अभ्यास करून वेगवेगळे उत्पादन बनवता येतील का याचा प्रयोग सुरू केला त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधून नायलॉनचे विविध प्रॉडक्ट पॉलिस्टर फिल्म, सिंथेटिक बुस्टस्, प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग आणि ब्लो मोल्डिंग इत्यादी प्लास्टिक उद्योगाशी संबंधित अनेक वस्तूंची उत्पादनं त्यांनी सुरू केली गरवारे मोटर्स, गरवारे प्लास्टिक, गरवारे रोप, गरवारे कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्या त्यांनी सुरू केल्या.
(Garware Polyester Film/Photo Credit:Google)
एकीकडे दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि सोबतच भारताचा स्वातंत्र्यलढाही तितक्याच जोरात सुरू होता. गांधीजींच्या नेतृत्वाखाली अक्खा भारत देश स्वतंत्र्यप्राप्तीसाठी रस्त्यावर उतरला होता देशात चाललेल्या या क्रांतीपासून स्वतःला रोखणं आबासाहेबांनाही शक्य नव्हतं, गांधीजींच्या विचारांचे पाईकत्व त्यांनीही स्वीकारलं होतं गांधीजींनी सांगितलेल्या स्वदेशी आणि कामगार हिताचं त्यांनी आपल्या कंपनीत कटाक्षाने पालन केलं भारतातल्या उद्योगपतींनी मालक होण्यापेक्षा कंपनीचे ट्रस्टी म्हणून काम पाहावं हा संदेश आबासाहेबांनी तंतोतंत पाळला होता ,स्वतः अत्यंत कष्टातून आलेले असल्यामुळे सर्वसामान्य कामगारांबद्दल त्यांना सहानुभूती होती.
नक्की वाचा:“आपल्या कमजोरीवर मात करत अजरामर भूमिका साकारणारे रोवन अटकिन्सन”