“चांगल्या वेळेपेक्षा जास्त चांगल्या व्यक्तीशी नातं ठेवा व्यक्ती चांगली वेळ आणू शकते परंतु लक्षात ठेवा की चांगली वेळ कधी चांगली व्यक्ती आणू शकत नाही.”
ही गोष्ट आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिष्याची भगवान बुद्धांच्या मठाचा एक नियम होता जेव्हा पण त्यांचा कोणी शिष्य बुद्धत्वाला प्राप्त होत असे तेव्हा बुद्ध त्या शिष्याला एका दिशेला जाण्यास सांगत होते आणि त्या दिशेला जाऊन ते एक जागा सांगत होते तिथे जाऊन रहा आसपासच्या लोकांचं ज्ञान अर्जित करा त्यांची आत्मजागृती करा त्यांच्या चेतनेला जागृत करा प्रयत्न करा की त्यांना सन्मार्गावर आणलं जाऊ शकेल.
त्यांचा एक शिष्य होता जो की सात आठ वर्षांपासून त्या मठात राहून तपस्या करत होता एक दिवस तो त्रस्त झाला की माझ्या गुरूंनी मला आदेश का दिला नाही की जाऊन प्रवचन कर इथून निघून जा आणि आपला स्वतःचा आश्रम बनवून रहा याच गोष्टीवर नाराज होत शिष्य भगवान बुद्धाजवळ गेला आणि त्यांना म्हणू लागला गुरुदेव माझ्या तपस्येत असं काही कमी राहिलं मी ज्ञान अर्जित केलं नाही का तुम्ही अजून मला आदेश काढत नाही की जाऊन दुसऱ्या ठिकाणी ज्ञान वाट म्हणून ,काय मी बुद्धत्व प्राप्त केलं नाही का?
गौतम बुद्धांनी त्याला म्हटलं की तुला अजून वेळ लागेल तू थोडे दिवस अजून इथेच थांब तो शिष्य म्हणला की गुरुदेव तुमच्या ज्ञान देण्यात तर काही कसर नाही ना राहिली मला तुमच्याकडून मिळणारे ज्ञान अर्धवट तर नाही ना राहिलं भगवान बुद्धांना वाटलं की हा समजणार नाही.
नक्की वाचा:“आपल्या कमजोरीवर मात करत अजरामर भूमिका साकारणारे रोवन अटकिन्सन”