पाण्यात पडल्यावर माणसाचा मृत्यू होत नाही तर माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नसेल, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा माणसाला समस्यांशी कसं निपटावं हे जमत नाही.
एक गोष्ट आहे अपंग राजाची ज्याच्या राज्यात कुठे काहीच समस्या नव्हती सर्व लोक खुश होते वरच्याला सतत धन्यवाद करत होते आणि म्हणत होते की किती चांगला राजा तुम्ही आमच्या आयुष्यात पाठवला आहे.
राजा अपंग होता त्याला एक डोळा नव्हता एक पायही नव्हता परंतु राजाला या गोष्टीचं अजिबात दुःख नव्हतं एक दिवस राजा आपल्या महालाच्या गॅलरीतून फिरत होता आणि तिथे लावलेले फोटो बघत होता भारी भारी पेंटिंग लावलेली होती ,ती खूपच शानदार होती, ती त्याच्या पूर्वजांची पेंटिंग होती त्याच्या वडिलांची ,वडिलांच्या वडिलांची, आजोबांच्या वडिलांची;
राजा फिरता फिरता त्या पेंटिंगला बघत न्याहाळत विचार करत होता की इतक्या शूरवीरांच्या खानदानामध्ये जन्माला येण्याची मला संधी मिळाली वरच्याचे धन्यवाद आहेत माझे वडील एवढे शूरवीर होते त्यांचे वडील शूरवीर होते आमची संपूर्ण पिढीच शूरवीर होती तो बघतच चालला होता आणि त्यानी शेवटची पेंटिंग बघितली.
त्यानंतर मोकळी जागा बघितली तेव्हा तो काळजीत पडला त्याला माहीत होतं की इथे जी पेंटिंग लागणार आहे ती त्याचीच लागणार आहे त्याला या गोष्टीची अजिबात काळजी नव्हती की तो मरणार आहे मरण तर सगळ्यांनाच येणार आहे त्याला चिंता तर या गोष्टीची होती,की तिथं लागणारी पेंटिंग कशी लागेल त्याला वाटलं की माझा एक डोळा नाहीये एक पाय नाहीये येथे लागलेल्या सर्व पेंटिंग भारी आकर्षक आहे परंतु जेव्हा माझी आशा अवस्थेतली पेंटिंग लागेल तेव्हा ती खराब वाटेल त्याला आपली चिंता वाटू लागली .
राजाने विचार केला की मेल्यानंतर काय माहिती माझी पेंटिंग कशाप्रकारे लागेल त्यामुळे मी जिवंत आहे तोपर्यंत एक पेंटिंग बनवून घेतो म्हणजे मला ती कशी लागणार आहे हे आत्ताच पाहायला मिळेल आणि हा आनंदही मिळेल की माझी चांगली पेंटिंग लागली आहे त्या राज्यात लगेच जाहीर केले गेले की राजाची पेंटिंग बनवायचे आहे, पेंटरला आमंत्रण दिले गेले राजा साहेबांची उत्तम चित्रकृती बनवून उत्तम बक्षीस मिळवायचं आहे चित्रकारांना माहिती होतं की चांगली पेंटिंग बनवल्यावर चांगलं बक्षीस मिळणार आहे परंतु चांगली पेंटिंग बनणार कशी
राजसाहेबांना एक डोळा नाहीये एक पाय नाहीये त्या राजाची पेंटिंग सुंदर कशी काय बनणार आणि पेंटिंगचं बनवायची असेल तर चांगली तर सोडाच परंतु जर पेंटिंग खराब बनली तर राजा आपल्याला मोठी शिक्षा करेल त्यामुळे मोठमोठे चित्रकार पुढे आले नाहीत त्यांनी होकारही दिला नाही .
मात्र त्यावेळी एक मुलगा पुढे आला आणि त्याने हात वर करत म्हटले राजासाहेब मी तुमची पेंटिंग बनवू इच्छित आहे मला 24 तासांचा वेळ द्या त्याचं हे बोलणं ऐकून इतर चित्रकार आश्चर्यात पडले की ह्या मुलाला काय पाहिजे राजाला राग आणून द्यायचा आहे की राजाच्या हातून फासावर जायचं आहे हा काय पेंटिंग बनवणार?
राजाला विश्वास होता आणि राजाने असेच म्हटले की ठीक आहे मी तुला वेळ दिला अन पेंटिंग म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मुलगा पेंटिंग बनवून आणणार होता तेव्हा दरबार लोकांनी खचाखच भरला होता हे पाहण्यासाठी की त्या मुलाने नेमकी कसली पेंटिंग बनवली आहे म्हणून खूप दूरवरून लोक आले होते बघण्यासाठी जेव्हा त्या मुलाने पेंटिंग बनवून आणली तेव्हा प्रत्येक जण टाळ्या शिट्ट्या वाजवू लागला राजाने जेव्हा ती पेंटिंग पाहिली तेव्हा राजा म्हणाला वा काय पेंटिंग आहे यापेक्षा सुंदर पेंटिंग तर त्या आधीच्या पेंटिंग मध्येही नाही ही आत्तापर्यंतची सर्वश्रेष्ठ पेंटिंग आहे राजाने त्या मुलाला मोठा इनाम दिला.
तुम्ही विचार करत असाल की त्या राजाचा एक डोळा एक पाय नाही त्याची काय पेंटिंग बनली असेल त्या मुलाने राजाला घोड्यावर स्वार दाखवले एका बाजूने ते चित्र दिसत होते राजा तिरंदाजी करत होता निशाणा साधत होता आणि जेव्हा निशाणा साधतात तेव्हा एक डोळा बंद करतात त्याचा एक डोळा बंद होता तो डोळा बंद होता तो राजाला नव्हताच अशाप्रकारे एक डोळा दाखवला एकच पाय दाखवला राजाला निशाणेबाज दाखवलं आणि तीच पेंटिंग इतकी जबरदस्त बनली की तोपर्यंतची सर्वश्रेष्ठ होती.
त्यामुलासमोर पण आव्हान होतं संकटं होती परंतु त्यांने सकारात्मकता पॉझिटिव्हिटीची साथ सोडली नाही .जीवनात कितीही संकटं आली तरी त्यासाठी एक लस जरूरी आहे तीचं नाव आहे सकारात्मकता आणि ती रोज घेणे गरजेचे आहे जीवनात तुम्ही ज्या परिस्थितीत ज्या संकटात अडकतात आणि तेव्हा तुम्ही सकारात्मकतेची लस घेतलेली असेल तर विश्वास ठेवा तुम्ही नक्कीच त्या संकटातून बाहेर पडाल ,शेवटी एकच सांगायचं आहे की जीवनात उमेदीची साथ कधीच सोडू नका कारण ज्यांनी उमेदीची साथ सोडली जीवनाने त्यांची साथ सोडली प्रत्येक क्षण सकारात्मक रहा प्रत्येक दिवशी खुश रहा.