प्रत्येक वेळी असं नसतं की जर एखादा व्यक्ती रिकाम्या भांड्याने आपल्याकडे आला तर तो काहीतरी मागायलाच आला असेल म्हणून असेही होऊ शकते की तो सर्वकाही वाटून आला असावा.
एकदा एक व्यापारी उंट खरेदी करण्यासाठी एका बाजारात केला तिथे त्याला एक उंट आवडलाही उंटाचा सौदा वगैरे झाला आणि ठरलेली रक्कम त्याने त्या मालकाला दिली आणि उंट घेऊन आपल्या घरी आला ,
त्या उंट खरेदी केलेल्या माणसाचा एक खास नोकर होता जो की त्या माणसाचं सर्व काम सांभाळत होता जेव्हा उंट आला तेव्हा त्या नोकरान उंटाची जी काठी असते ती उतरवली तेव्हा तोही आश्चर्यचकित झाला कारण त्या काठीला लावलेली मखमली पिशवी होती आणि त्यात खूपच मौल्यवान हिरे होते हे हिरे बघून तो आनंदात पळत पळत आपल्या मालकाकडे ती पिशवी दाखवण्यासाठी गेला
आणि म्हणून लागला की मालक तुम्ही फक्त उंटच नाहीतर त्यासोबत खूप सारे मौल्यवान हिरे आणले आहेत व्यापाऱ्यानी म्हटले काय बोलतोस तेव्हा नोकरांनी त्या पिशवीतले सर्व हिरे काढून त्याच्या मालकाला दाखवले त्यावर व्यापाऱ्यानी म्हटले
की या पिशवीला परत बांध मी ती पिशवी परत त्या मालकाला देऊन येतो. नोकर विचार करू लागला की किती मूर्ख मालक आहे चांगला फुकटमध्ये मिळालेला माल परत नेऊन देत आहे तो मालकाला म्हणू लागला की आपल्याकडे हिरे ठेवून घेऊयात कोणाला त्याबद्दल काय माहिती पडणार आहे व्यापारी म्हटला असं नाही मी ते परत द्यायला चाललो आहे.
व्यापाराने ती मखमली पिशवी घेतली आणि त्या बाजारात जाऊन मूळ मालकाला शोधू लागला खूप शोधल्यानंतर त्याला तो व्यापारी भेटला आणि म्हटला
तुम्ही जो उंट विकला आहे त्यासोबत एक पिशवी होती त्यात मौल्यवान हिरे आले आहेत ते परत करायला आलो आहे उंटवाल्याने म्हटले की तरीही मी म्हटलं की ती पिशवी का सापडत नाहीये म्हणून कुठे गेली, ती तर तुमच्या सोबत आली होती तर आणा इकडे आणि खूप खुष झाला, की किती इमानदार माणूस आहे परत करायला आला म्हणून,
तर तो त्याला म्हटला की मी तुमच्या इमानदारीवर खूप खुश झालो आहे त्यामुळे तुम्हाला एक बक्षीस देऊ इच्छित आहे या सर्व हिऱ्यांपैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्हाला घ्या व्यापाऱ्याने म्हटले की मला काहीही नको आहे मी फक्त तुमची पिशवी परत करायला आलो आहे, परंतु मूळ मालक काहीही ऐकायला तयार नव्हता तो मात्र आग्रह करतच होता तुम्ही घ्या तुम्ही घ्या म्हणून त्यावर नवीन व्यापाऱ्याने म्हटले की मी आधीच दोन हिरे स्वतः जवळ ठेवले आहेत.
नक्की वाचा:“परिस्थिती ही कायम सर्वांसाठी सारखी नसते”