(Photo credit:Google)
|बडा सोचो जल्दी सोचो और आगे का सोचो क्योंकी विचारों पर कभी किसी का नियंत्रण नही होता |
असा विचार होता धीरूभाई अंबानी यांचा ज्यांनी अतिशय सामान्य परिवारात जन्म घेऊनही जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीत येण्याचा संघर्षमय मार्ग निवडला.फारच थोड्या लोकांना धीरूभाई अंबानी यांचं खरं नाव माहिती असेल त्यांचं खरं नाव “धिरजलाल गोवर्धनदास अंबानी” होतं. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ मध्ये गुजरात मधल्या चोरवाड येथे झाला .
महाविद्यालयात असतानाच त्यांनी शिक्षण सोडलं आणि भजे विकायला सुरुवात केली. मित्रांनो धीरूभाईंचं असं म्हणणं होतं की शिक्षण आणि पैशाचा काहीही संबंध नसतो.कारण हे आवश्यक नाही की जगभरात फक्त शिक्षित लोकंच पैसा कमावू शकतात
म्हणून ,काही वर्षे फिरुन भजे विकल्यानंतर . सन १९४८ मध्ये १६ व्या वर्षी आपले बंधू रमनिकलालच्या मदतीने आपल्या मित्रासोबत ते ओमानला नोकरीसाठी गेले तेथे गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा पेट्रोल पंपावर नोकरी करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्याच कंपनीत क्लर्कच्या पदावर ३०० रुपये प्रतिमाह पगाराने नोकरी करु लागले. आणि दिवसभराच्या कामानंतरही ते कुठंना कुठंतरी पार्ट टाइम नोकरी करत असत त्यामुळे त्यांच्या इतर मित्रांपेक्षा जास्त पैसे शिल्लक राहत.त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता की आपल्याला आयुष्यात छोटामोठा धंदाच करावा लागेल आणि व्यवसायासाठी पैसा तर लागेलच .
नक्की वाचा: नेब्रास्का फर्निचरची सक्सेस स्टोरी .
बऱ्याच ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी आपल्या कामात कधीही कुचराई केली नाही.पुर्ण मेहनत आणि इमानदारीने आपलं काम निभावलं . त्यामुळे त्यांच्या कामावर खुश होऊन कंपनीच्या मालकाने बढती करत त्यांची मॅनेजरपदी नियुक्ती केली.परंतु फक्त थोडेचं दिवस त्यांनी ही नोकरी केली आणि नंतर ती नोकरी सोडून ते भारतात परत आले कारण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होते.