BABA KALYANI (Photo credit: Google)
आपल्या मराठी माणसाला कायम आणि नेहमीच एक गोष्ट खटकत आली आहे ती म्हणजे श्रीमंतांच्या बाबतीत मराठी माणसांचं स्थान जेव्हा जेव्हा संपूर्ण देशभरातील श्रीमंतांचा विचार केला जातो तेव्हा भारतातील मराठी माणूस मात्र कुठेही आढळून येत नाही आणि आढळला तरी त्याचं स्थान मात्र अतिशय नगण्य आणि
डोळ्यांत न भरण्याइतकी कमी असते कारण या यादीची सुरुवात मात्र गुजराती, मारवाडी, पारशी, पंजाबी, सिंधी यांनी झालेली असते अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासूनच श्रीमंत आणि गडगंज पैसा कमवलेल्या व्यक्तींमध्ये मात्र बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींचा संबंध आढळून येतो
त्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मराठी व्यक्तिमत्त्वाबद्दल आज तुम्हाला अवगत करून देणार आहोत
आणि त्यांनी ज्या परिस्थितीमधून भारतातल्या आज प्रमुख मोठ्या व्यवसायिकांमध्ये येण्याची मजल मारले आहे ती तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आणि नेहमीच दिशादर्शक अशीच राहणार आहे.
ही व्यक्ती श्रीमंत आहेच पण कोणी राजकारणी किंवा बिल्डर किंवा मोठ्या रस्ते कॉन्ट्रॅक्टची मालक नाही. तर ती व्यक्ती आहे भारतीय फोर्जिंग इंडस्ट्रीजचा बाप यांनी बोफोर्सपेक्षाही शक्तिशाली तोफ बनवली तीपण पुण्यात. काळे धंदे करून नाही तर अस्सल आपली मेहनत टाकून कसे पैसे कमवायचे हे सांगणारा माणूस म्हणजे बाबा कल्याणी होय.
बाबा कल्याणी यांच्या भारत फोर्जमध्ये तर मोठे मोठे शक्तिशाली अवजारे बनवणाऱ्या या कंपनीची सुरुवात ही नीलकंठ कल्याणी यांनी केली.
कल्याणी मूळचे सातारा जिल्ह्यातील कोळे या गावचे शेतकरी कुटुंब. नीलकंठ कल्याणी यांचे वडील हळदीचा व्यापार करायचे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर निळकंठ कल्याणी यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले व घरची जबाबदारी स्वीकारावी लागली याच काळात नीलकंठ कल्याणी यांचा महाराष्ट्रातील आघाडीचे दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी संपर्क आला कल्याणी कुटुंबाने यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या लहानपणीच्या काळात मोठी मदत केली होती स्वातंत्र्य लढ्यावेळी देखील त्यांची मोठी मदत झाली होती ती त्यांचे उपकार विसरलेले नव्हते नीलकंठ कल्याणी यांना त्यांनी शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे पाठवले पुढे नीलकंठ यांनी किर्लोस्कर यांच्या मदतीने पुण्याला मुंढवा येथे फोर्जिंगचा व्यवसाय सुरू केला ते वर्ष होते 1961.
नुकतीच संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती राज्यात औद्योगिकीकरणाचे प्रयत्न सुरू होत यात कल्याणी यांचे भारत फोर्जदेखील आघाडीवर होते निळकंठ कल्याणी हे कल्पक उद्योगपती असल्यामुळे त्यांनी कल्याणी उद्योग समूहाच्या विस्तारास सुरुवात केली.
वैद्युतिक वस्तूंपासून कृषी क्षेत्राला लागणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश होता याशिवाय त्यांनी कल्याणी फोर्ज, कल्याणी ब्रेक स्थापन केले नीलकंठ कल्याणी यांचे सुपुत्र बाबा कल्याणी यांनी या क्षेत्रात २३ व्या वर्षी उडी घेतली.
बाबा कल्याणी यांचे शिक्षण बेळगाव इथल्या सैनिकी शाळेत झालं सैनिकी गणवेशाचं त्यांना आधीपासूनच आकर्षण होतं.फर्गुसन कॉलेजमध्ये शिकत असताना बाबा कल्याणी यांचा कल अचानक अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळला
कॉलेजमध्ये त्यांचे सोबती होते शरद पवार यांचे छोटे बंधू प्रतापराव पवार व पृथ्वीराज चव्हाण हा सर्व गट अभ्यासात खूप हुशार होता त्या सर्वांनी ठरवून इंजिनिअरिंग साठी BITS पिलानी येथे प्रवेश घेतला. बाबा कल्याणी यांनी पिलानी येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं व उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील एमआयटी येथे गेले यात शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठ्या कंपन्या डोळे बांधून आपल्या कंपनीत यांना घ्यायला तयार असतात परंतु बाबा कल्याणी हे नोकरी न करता आपल्या कंपनीमध्ये परत आले.
1972 ला त्यांनी भारत फोर्ज जॉईन केलं. त्यांचं झालेलं आगमन हे त्यांच्या कंपनीतल्या कामगारांना आवडलेलं नव्हतं त्यामुळे त्यातल्या बऱ्याच कामगारांनी राजीनामा दिला, कल्याणींना हा मोठा धक्का होता.
नक्की वाचा:वयाच्या ९६व्या वर्षी आपल्या व्यवसायाला पुनर्स्थापित करणाऱ्या नेब्रास्का furnitureच्या ”रोज ब्लमकीन”
परंतु शंतनुराव किर्लोस्कर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले परिस्थितीत मोठी परीक्षा असे त्यांनी त्यांना समजावले.त्यांच्या या शब्दांनी बाबा कल्याणींना धीर आला नंतरच्या काळात त्यांनी त्यांच्या कंपनीचा आक्रमकपणे विस्तार केला त्या काळच्या लायसनराशी टक्कर घेत आपल्या कंपनीचा भारताबाहेर विस्तार करण्याचे त्यांनी ठाम केले, अमेरिकेतील ब्रेक उत्पादन करणारी कंपनी जपान मधील कंपनी अशा कंपन्यांशी त्यांचा करार झाला होता.जर्मनीतील सर्वात मोठी कंपनी सी .डी. बी हिला ताब्यात घेऊन जागतिक फोर्जिंग क्षेत्रात नाव केलं होतं.
मशीन म्हणजे देव आणि उत्पादन म्हणजे भक्ती या धोरणावर त्यांनी कंपनीचा कारभार पाहिला नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचा फटका भारत फोर्जलादेखील बसला परंतु दूरदृष्टी दाखवत त्यांनी काही पावलं मागे घेतली
त्यांचे इतर व्यवसायाचे लक्ष कमी करत आपल्या फोर्जिंग क्षेत्रावर त्यांनी आपले सगळे लक्ष एकवटलं ज्याचा त्यांना फायदा झाला.
नीलकंठ कल्याणी यांचं औद्योगिक क्षेत्रात दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने पुण्याच्या एका भागाला कल्याणीनगर असे नाव देण्यात आले आहे.
(Photo credit: Google)