“वाईट झालं म्हणजे असं नाही कि सगळं संपलं; तर त्यातून चांगल्याचीही सुरुवात होत असते”
By phoenixmotivation.in
“किती पण ज्ञानी लोकांच्या संगतीत बसा परंतु खरा अनुभव तर तेव्हाच येतो जेव्हा आपण स्वतःच मूर्ख बनत नाही”
खूप जुनी गोष्ट आहे एकदा यमराजांनी त्यांच्या दूतांना एका स्त्रीचा आत्मा आणण्यासाठी पाठवले यमदूत जेव्हा पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्या महिलेची तीन छोटी मुलं आहेत ज्यांचं रडून रडून खराब हाल झाले आहेत घरात पतीचा आधीच मृत्यू झालेला आहे त्या मुलांना सांभाळणारे कोणीही नाही हे बघून यमदूताचं हृदय पाघळलं आणि ते परत यमदेवांकडे गेले आणि म्हटले की मी देवा मला क्षमा करा मी आत्मा नाही आणू शकलो माहिती नाही खाली काय चालू आहे त्या स्त्रीची तीन छोटी छोटी मुले आहेत त्यांना कोणीही संभाळणारं नाही आणि त्या महिलेच्या कुटुंबात कोणीही उरलेले नाही त्या मुलांची काळजी कोण घेणार मी तर म्हणतो त्या महिलेला अजून थोडं जीवदान दिलं जावं की ज्यामुळे त्या मुलांना मोठं होता येईल मग त्या महिलेला बोलावता येईल हे ऐकून यमराज क्रोधित झाले,
आणि रागावूण म्हणून लागले की बरं तू आता माझ्यापेक्षाही जास्त समजदार झालास की जन्ममृत्यु निश्चित करायला लागलास तू हे काम न करून मोठा गुन्हा केला आहेस त्याची शिक्षा म्हणून तुला पृथ्वीवर जावे लागेल आणि ही शिक्षा भोगावी लागेल तू जोपर्यंत आपल्या मूर्खपणावर तीन वेळा हसणार नाही तोपर्यंत तुला पुन्हा येता येणार नाही यमदूताला तेव्हाही वाटत होतं तो बरोबर आहे परंतु त्याला ती शिक्षा भोगावी लागणार होती.
आणि ती शिक्षा भोगण्याकरता यमदूत त्याच देशात येऊन राहायला लागला जिथं तो आत्मा आणायला गेला होता एका शहरात रस्त्याच्या कडेला खराब परिस्थितीत तो पडला होता एका गावातून एक चर्मकार तुटलेल्या चपला शिवणारा कारागीर आपल्या मुलांना गरम कपडे व स्वेटर घेऊन जाण्यासाठी आला होता कारण थंडीचे दिवस होते त्याने पाहिले की एक खूपच गरीब त्याच्यापेक्षाही गरीब खराब परिस्थितीत एक माणूस पडलेला आहे त्याने विचार केला की आधी या गरीब माणसाची मदत केली जावी यामधून जो खराब परिस्थितीत पडला होता त्याच्यासाठी त्याने आधी गरम कपडे खरेदी केले आणि बोलता बोलता माहिती पडलं की त्याला राहायला घर नाही तेव्हा तो कारागीर म्हटला की चल माझ्याचं घरी राहा म्हणून,
कारागीर जेव्हा त्याला सोबत घेऊन जात होता तेव्हा तो म्हणाला की माझी पत्नी आता खूप रागावेल कारण मी खूप मेहनतीने आणि जास्त प्रयत्न करून पैसे जमवले होते कपडे आणण्यासाठी परंतु ते कपडे मी तुझ्यासाठी घेतले तो जे सांगेल ते यमदूत ऐकून घेत होता घरी पोहोचल्यावर कारागिराच्या पत्नीने जोरजोरात रागावण्यास सुरुवात केली कारण त्याच्या पत्नीला समजत नव्हतं की घरात कोण आले आहे कारण तो आला म्हणजे घर संपूर्ण साधन संपत्तीने भरून जाईल घरात ऐश्वर्य ,समृद्धी येईल तिला काही समजत नाहीये ती फक्त एवढेच बघत आहे की तिच्या मुलांना कपडे आणले नाही आणि खरं म्हणजे माणूस एवढ्या लांबचं थोडंच बघतो त्यावर कारागीराने यमदूताला तू का हसतो म्हणून विचारले तर यमदूत म्हणाला आता लगेच नाही जेव्हा मी तीन वेळा हसेल तेव्हा संपूर्ण गोष्ट सांगेल कारागिराच्या पत्नीने थोडा वेळ रागराग केल्यानंतर सर्व शांत झालं यमदूत त्यांच्यासोबत राहू लागला.
कारागीर जो काम करत होता ते काम यमदूतानेही करण्यास सुरुवात केली आणि तेही एवढ्या कुशलतेने की त्या कामाची प्रसिद्धी राज्यात सर्वत्र पसरू लागली एवढेच काय की त्या राज्याच्या राजाच्या चपला देखील त्या कारागीराकडे बनू लागल्या एक दिवस त्या राजाचा मंत्री थोडसं चमडं घेऊन आला आणि म्हणाला की हे खूप मौल्यवान चमडं आहे राजासाठी याचा बूट बनवायचा आहे लक्षात घ्या फक्त बूट बनवायचा आहे चपला नाही, चपला त्याकाळी फक्त तेव्हाच घातल्या जायच्या जेव्हा कोणाचातरी मृत्यू झाला असेल अशी त्या राज्याची प्रथा होती चपला घालून मृताला स्मशानापर्यंत पोहोचवलं जात असे त्याने म्हटले एवढ्या चमड्यात बूटं बनवायची आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे यमदूताने त्या चामड्याच्या चपलाच बनवल्या हे बघून कारागी रागावला आणि म्हटला राजासाठी बूट बनवायचे होते आणि तू चपला बनवल्या तू नक्कीच राजाच्या हातून फाशी द्यायला लावशील चमडं थोडंच होतं, की लाकूड उचलून त्याला मारायला लागला;
तेवढ्यात राजाचा माणूस आला आणि म्हणाला ऐका ते कातडं दिलं होतं त्यापासून तुम्ही बूट तर नाही बनवले ना त्या चामड्यापासून चपला बनवा कारण आता राजाचा मृत्यू झाला आहे राजाची इच्छा होती की त्या चामड्यापासून बनलेली बुटं घालण्याची परंतु त्याच्याच चपला घालून त्यांना स्मशानापर्यंत घेऊन गेले जाईल त्यांनी लगेच चप्पल आणून ठेवल्या की तयार आहेत. राजाच्या माणसाला काही समजले नाही तो चपला घेऊन लगेच पळाला जो चपला बनवणारा कारागीर होता तो यमदूताला म्हणू लागला की तुला कसं माहीत होतं की राजा मरणार होता यमदूत जोराजोरात हसायला लागला आणि म्हणाला आता काहीच विचारू नकोस नंतर सांगेन
एक दिवस अजून एक घटना घडली तीन मुले एका म्हाताऱ्या बाईसोबत भेटायला आली आणि म्हणाली की आमचं लग्न होणार आहे आमच्यासाठी चांगले सॅंडल बनवायचे आहेत तेव्हा यमदूत ओळखून जातो की ही तीन तीच मुले आहेत त्यांच्या आईचा आत्मा न्यायला आलो होतो तरी यमदूत महिलेला विचारतो की ही मुलं कोण आहेत तेव्हा महिला म्हणते की आमच्या शेजारी एक गरीब महिला राहत होती त्यांची तीन मुले आहेत मला कोणीही मुलं नव्हती त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली मी त्या तीन मुलांना सांभाळलं त्या दिवशी यमदूताला समजलं की मी त्या दिवशी त्या महिलेचा आत्मा घेऊन न जाता तिथेच ठेवला असता तर( जे काम इतर यमदूतांनी केलं होतं) तेव्हा जर त्या महिलेला जीवनदान मिळालं असतं तर त्या तीनही मुलांना गरिबीतच दिवस काढावे लागले असते आणि तीनही मुलांचं भाग्य आधीपासूनच लिहिलं गेलं होतं त्यांना श्रीमंत घरात वाढायचं होतं धनधान्यआणि संपत्तीसोबत राहायचं होतं आणि त्यांना आईचे प्रेमही मिळालं जी आई मिळाली ती खूपच दयाळू आहे त्यावेळी यमदूत तिसऱ्यांदा हसला आणि खूप जोरजोरात हसला तेव्हा त्या कारागिराने विचारलं आता तरी सांग
त्यावर यमदूताने संपूर्ण गोष्ट सांगितली म्हटलं की मी माझी शिक्षा भोगत होतो आणि आज मला समजले की जो वरच्याचा खेळ आहे त्यापेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही त्यामुळे काय होईल कसं होईल चांगलं होईल वाईट होईल सौभाग्य असेल तर दुर्भाग्य असेल हा सगळा विचार करणे बंद करा आणि पुढच्या आयुष्यात जगायला सुरुवात करा.