Chamkaur War 1Million Mughal Vs 40 Sikh/(Photo Credit:Google)
“22 डिसेंबर 1704” ला सिरसा नदीच्या किनारी चमकौर या ठिकाणी शीख आणि मुघलांमध्ये खूप मोठं युद्ध झालं त्याला चमकौरच युद्ध म्हणून ओळखलं जातं यामध्ये शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांच्या नेतृत्वाखाली 40 शीखांचा सामना वजीर खानच्या नेतृत्वाखाली असलेल्या दहा लाख मुघलांशी झाला.
वजीर खान गुरुगोविंदसिंगांना जिवंत किंवा मृत पकडू इच्छित होता कारण औरंगजेबाच्या हजारो प्रयत्नानंतरही गुरुगोविंदसिंग महाराज मुघलांच अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते परंतु महाराजांच्या दोन मुलांनी वजीर खानला आपल्या हेतूत सफलता मिळून दिली नाही आणि दहा लाखांची मुघल सेनाही महाराजांना पकडू शकली नाही.
हे युद्ध इतिहासात शीखांची वीरता आणि त्यांची आपल्या धर्माच्या प्रती आस्थेसाठी ओळखलं जातं. गुरु महाराजांनी युद्धाच्या वेळी असं म्हटलं होतं की. “चिडीयों से मे बाज लडाऊं गिधडो को मे शेर बनाऊ सव्वा लाख से एक लडाऊं तभी गोविंदसिंग नाम कहाऊं”
मे 1704 मध्ये आनंदपुरच्या शेवटच्या लढाईत याच मुघल शासकांच्या संयुक्त फौजांनी आनंदपुरसाहेबला सहा महिन्यांपर्यंत घेरलं होतं त्यांचा विचार होता की आनंदपुर साहेबचं धान्यपाणी संपून जाईल तेव्हा गुरुसाहेब मुघलांना शरण जातील परंतु हा मुघलांचा सर्वात मोठा वेडेपणा होता जेव्हा आनंदपुर मधलं धान्यपाणी संपलं तेव्हा गुरुगोविंदसाहेब आपल्या आनंदपुरमधल्या सर्व साथीदारांना घेऊन एका रात्रीच तिथून रवाना झाले.
परंतु काही काळाने मुघल सैन्याला माहिती झाले की गुरु महाराज येथून निघून गेले आहेत म्हणून ते त्यांचा पाठलाग करू लागले आणि तिकडे गुरु महाराज आपल्या साथीदारांना घेऊन सिरसा नदीच्या दिशेने चालले होते ज्यावेळेस शिखांचा ताफा सिरसा नदीच्या किनारी पोहोचला त्यावेळी नदीला भयंकर पूर आला होता आणि पाण्याचा वेगही वाढलेला होता त्यावेळी शीख प्रचंड संकटात सापडले त्यांच्या मागे शत्रूची सेना तुटून पडल्यासारखी धावत येत होती आणि समोर सिरसा नदीने रौद्र रूप करून धारण केलेले होते निर्णय झटकन घ्यायचा होता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यावेळी गुरुगोविंदसिंग महाराजांनी म्हटलं की काही सैनिक इथेच थांबून शत्रूला काही काळ खिळवून ठेवा आणि जे कोणी नदी पार करू शकतात त्यांनी लगेच आपल्या घोड्यांसहित नदी पार करा आणि असंच केलं गेलं .भाऊ उदयसिंह आणि भाऊ जीवनसिंग यांनी आपली तुकडी घेऊन शत्रूसैन्यावर तुटून पडले एवढ्यात गुरु महाराज सिरसा नदी पार करण्यात यशस्वी ठरले आणि काही शेकडे सैनिक नदी पार करता करता मृत्युमुखी पडले कारण पाण्याचा वेग खूपच जास्त होता पाण्याच्या वेगामुळे काही जण तर एवढ्या लांब वाहत गेले की हे बघून शत्रू सैन्यांनी नदी पार करण्याचे धाडसच केलं नाही.
सिरसा नदी पार केल्यानंतर 40 शीख गुरुगोविंदसिंग महाराज दोन मोठे साहेबजादे अजितसिंग तसेच झुजारसिंग असे मिळून 43 जणांची संख्या भरली जे नदीच्या पलीकडे पोहोचले होते आणि नदीच्या अलीकडे थांबलेले भाऊ उदयसिंग मुघलांच्या अनेक हल्ल्याला पछाडत होते आणि तोपर्यंत लढत राहिले जोपर्यंत त्यांच्या रक्ताचा शेवटचा थेंब संपत नाही आणि शेवटी ते आपलं कर्तव्य बजावत वीरगतीला प्राप्त झाले.
या भयंकर घटनेत गुरु गोविंदसिंग यांचा परिवार त्यांच्यापासून दूर लोटला गेला गुरुदेव आपल्या चाळीस शीखांना घेऊन पुढे चालत चालत दुपारपर्यंत चमकौर नावाच्या ठिकाणी एका बागेत पोहोचले तिथल्या स्थानिक लोकांनी गुरुगोविंदसिंग यांचं मोठ्या थाटामाटात स्वागत केलं आणि प्रत्येक प्रकारची मदत केली इथे एक किल्ल्यासारखी कच्ची हवेली होती जी की साम्राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण होती कारण तिला उंचावर बसवलं गेलं होतं ज्याच्या चारही बाजूने एक समतोल असं मोकळं मैदान होतं त्या हवेलीचे जे मालक होते त्यांनी गुरुगोविंदसिंग महाराजांना आग्रहाची विनंती केली की तुम्ही या हवेलीत आराम करा म्हणून गुरुजींनीही पुढे जाणं योग्य समजलं नाही आणि 40 शिखांमध्ये राहिलेले युद्धाचं सामान वाटून लढण्यासाठी तयार केलं प्रत्येकाने ठरवलं होतं की एक तर मरू नाहीतर शत्रूला मारू,
खालसा सैन्याचे तत्व होतं की शत्रू पुढे कधीही हत्यार टाकू नका फक्त वीरगतीच अंतिम विजय आहे. चाळीसच्या ताकदीच्या जोरावर शीख मुघलांच्या असंख्य सैन्याशी लढण्याचं नियोजन करू लागले गुरु महाराजांनी कच्ची गढी हवेलीवर केसरी ध्वजाला सोबत घेऊन आपला मोर्चा सांभाळला बाकी शीखानींही आपआपले मोर्चे बनवले आणि मुघल सैन्याची वाट पाहू लागले तिकडे जसा सिरसा नदीचा वेग कमी झाला तसं मुघल सैन्याने लगेच नदी पार केली आणि शिखांचा पाठलाग करत करत चमकौरच्या मैदानात येऊन पोहोचले बघता बघता शत्रुसेनेने गुरुसाहेब आराम करत असलेल्या हवेलीला घेरले मुघल सैन्याला गाववाल्यांकडून माहिती पडलं होतं की गुरु महाराजांसोबत फक्त 40 सैनिकच आहेत त्यामुळे ते गुरु महाराजांना बंदी बनवण्याचे स्वप्न बघू लागले मुघलांचा नवा सेनापती वजीर खानने मोठी घोषणा केली की गुरुगोविंदसिंग यांनी आपल्या सैनिकांसोबत स्वतःला आमच्या स्वाधीन करावं असं केल्यास त्यांना जीवनदान दिलं जाऊ शकतं;
Guru Govindsingh Maharaj/(Photo Credit:Google)
या गोष्टीला उत्तर म्हणून शीखांनी मुघल सैन्यावर बाणांनी हल्ला करण्यास सुरुवात केली यावेळी 40 शिखांचा सामना दहा लाख मुघलांशी होत होता त्यावेळी गुरु महाराजांनी एकेका सैनिकाला सव्वा सव्वा लाख शत्रू सैनिकांशी लढण्याची शपथ दिली होती आणि गुरु महाराजांची ही शपथ चमकौरच्या मैदानात चांगलीच गाजली.
२२ डिसेंबर १७०४ ला जगातल्या वेगळा युध्दाची सुरुवात झाली आकाशात काळेकुट्ट घनदाट ढग जमा झाले होते आणि रिमझिम पावसाचे थेंब पडत होते वर्षातला सर्वात छोटा दिवस असल्यामुळे सूर्य ही जरा उशिराच उगवला होता कडाक्याची थंड हवा सुटली होती तरीही प्रचंड गरमी पसरली होती ती म्हणजे कच्चीगढी हवेलीत थांबलेल्या शिखांच्या अंगात कच्चीगढी हवेलीवर शत्रूंनी घनघोर प्रहार केले त्यांच्या उत्तरादाखल हवेलीतूनही बाण व गोळ्यांचा मारा झाला अनेक मुघल सैनिक धारातीर्थी पडले मुघल सेनापतींना अविश्वास होऊ लागला होता की कोणी मात्र चाळीस शीखांच्या मदतीने एवढा ताकतवर कसा काय बनवू शकतो शिखसैनिक लाखोंच्या मुघल सैनिकांनी वेढलेले असूनही निर्भयपणे लढण्या मरण्याचा खेळ खेळत होते.
आता शिखांकडचा बाण तसेच गोळ्यांचा साठा संपुष्टात आला होता त्यामुळे त्यांनी तलवार आणि भाल्याने मैदानावर समोरासमोर लढण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम भाई हिम्मतसिंगला गुरू महाराजांनी आदेश दिला की ते आपल्या पाच सैनिकांची तुकडी घेऊन युद्धभूमीवर जावे आणि शत्रू सेनेला आपल्या ताकदीची ओळख करून द्यावी तेव्हा मुघल जनरल नाहर खानने गढीवर शिडी लावून चढण्याचा प्रयत्न केला परंतु गुरुदेवांनी त्याला बाण मारून तिथेच गार केलं सरहिंदच्या नवाबने सर्वसैनिकांना एकत्र करून पुन्हा एकदा कच्ची गढीवर आक्रमण करण्याचा आदेश दिला परंतु महाराज उंचावर असलेल्या हवेलीत असल्यामुळे चांगल्या स्थितीत होते आणि त्यांनी हे आक्रमण ही निष्प्रभ केले.
(Map of Chamkaur sahib/Photo Credit:Google)
शिखांच्या तुकडीने गडाच्या बाहेर पडत मुघल सैनिकांवर जोराने प्रहार करायला सुरुवात केली गडाच्या वर लागलेल्या केसरी ध्वजापाशी थांबलेले गुरु महाराज स्वतः थांबून आपल्या सैन्याची साथ देत होते काही काळ लोखंडावर लोखंड घनाघाती प्रहार करत आदळत होतं शेकडोसैनिक मृत्यूमुखी पडले आणि शेवटी पाच सैनिकही शहीद झाले आणि पुन्हा एकदा गुरु महाराजांनी आपल्या पाच सैनिकांची तुकडी बनवून बाहेर पाठवली आणि या तुकडीने ही बाहेर पडून शत्रूच्या सैन्यावर घनाघाती वार करून त्यांना पळता भुई थोडी केली आणि त्यांना मागे ढकलले, शेकडो सैनिकांना मृत्यूमुखी पाडत अखेर तेही शहीद झाले.
या प्रकारे गुरु महाराजांनी रणनीती आखली आणि पाच पाच सैनिकांची तुकडी बनवून ते बाहेर पाठवू लागले जेव्हा पाचवी तुकडी शहीद झाली तेव्हा दुपारची वेळ झाली होती सूर्य डोक्यावर आला होता सरहिंदच्या नवाब खानने निर्देशांचे पालन करत मुघल सैन्यातल्या पाच सेनापतींना आपल्या सोबत सैनिक घेऊन कच्ची गढीकडे जायला सुरुवात केली शिख सैनिकांना वाटलं की एक साथ एवढा मोठा हल्ला थांबवणं सोपं राहणार नाही त्यामुळे त्यांनी गुरु महाराजांना विनंती केली
की तुम्ही आपल्या मुलांना घेऊन ही युद्धभूमी सोडून निघून जा हे ऐकून गुरू महाराजांनी शिखांना म्हटलं तुम्ही कोणत्या साहेबजाद्यांची गोष्ट करता तुम्ही माझे साहेबजादेच आहात गुरुदेवांचं हे उत्तर ऐकून तर सर्व शीख आश्चर्यात पडले महाराजांचे मोठे सुपुत्र अजितसिंग वडिलांकडून युद्धभूमीवर जाण्याची परवानगी मागू लागले तर महाराजांनी त्यांना लगेच आशीर्वाद देऊन कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रेरित करून पाठवलं अजितसिंह मध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत होती त्याचं वय अठरा वर्ष होतं मग काय ते आपल्या बाकीच्या सैनिकांना घेऊन गडावरून बाहेर गेले आणि मुघलांच्या सैन्यावर अशा प्रकारे तुटून पडले जसे की वाघ आपल्या शिकारीवर अजितसिंह ज्या दिशेने चाल करून जात तिकडून समोर येणारे सैनिक पडायचे धडपडायचे आणि पळून जायचे.
नक्की वाचा:“दु:खासोबत सुखातही ईश्वराला आठवत चला”