जीवनात संकटांची प्रत्येक दरी पार होईल थोडीशी हिम्मत ठेवा बघा एक दिवस चमत्कार पण होईल.
ही गोष्ट आहे का श्रीमंत शेठची ते त्या शहरातील सर्वात श्रीमंत शेठ होते त्यांच्याकडे खूप पैसा होता त्यांचे खूप सारे व्यवसाय होते खूप सारे कारखान्यांचे ते मालक होते त्यांना कशाचीच कमी नव्हती ते प्रत्येक गोष्टीने संपन्न होते.
एक दिवस ते आपल्या कंपनीचा दौरा करत घरी परतत होते मोठा आलिशान बंगला घरी येऊन पोहोचले तर सर्व लोक पूजा पाठ संध्याकाळची आरती करत होते त्या शेठची एक सवय होती ती म्हणजे ते देवापासून थोडं अंतर ठेवून होते नास्तिक प्रकारचे होते त्यामुळे ते या गोष्टींपासून दूर राहत आपल्या खोलीत ते शांतपणे निघून गेले तिथे जाऊन ते आपला हिशोब करू लागले काय योग्य अयोग्य झालं ते बघू लागले नोकराला सांगितलं की एक कॉफी घेऊन ये लवकर,नोकर गेला कॉफी तयार करण्यासाठी अचानक शेठच्या छातीत दुखू लागलं अस्वस्थता वाटू लागली त्यांनी लगेच नोकराला डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले कॉफी नंतर बनव.
त्या शहरातले सगळे टॉपचे डॉक्टर घेऊन त्यांना चेक करू लागले चेक करून झाल्यावर रिपोर्ट आले त्यातून कळाले की शेठजी तर चांगल्या प्रकारे व्यवस्थित होते शेठजीने म्हटले की मला अजूनही अस्वस्थ वाटत आहे माझ्यासाठी गोळ्या लिहून द्या डॉक्टरांनी म्हटले तुम्ही ठीक आहात कशाला परेशान होता. शेठजीचं मन अस्वस्थ होतं ते आतल्या आत विचित्र प्रकारे जाणवत होतं, तेव्हा डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि सोबत झोपेची गोळीही लिहून दिली आणि म्हटले झोप नाही आली तर ही गोळी पण घ्या आजसाठी या गोळ्या घ्या परंतु आपण इतर कोणत्या तरी गोष्टीसाठी त्रस्त आहात त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत आहे.
नोकरांनी जेवण बनवलं जेवण करून शेठनी गोळ्या घेतल्या आणि झोपण्यासाठी गेले परंतु झोप काही येत नव्हती त्यांनी उठून झोपेची गोळी घेतली तरीही झोप काही येत नव्हती खूप उशीर झाला होता. मध्येच उठून बघितलं तर रात्रीचे तीन वाजले होते सगळीकडे शांतता पसरली होती त्यांना वाटले की या बंद खोलीत दम कोंडत असावा म्हणून खोलीच्या बाहेर आले आणि अलिशान बंगल्याच्या बागेत फिरू लागले
परंतु तिथेही त्यांना आराम मिळत नव्हता त्यांनी विचार केला की थोडं बाहेर फिरून घेऊयात कॉलनीतल्या रस्त्याच्या कडे-कडेने फिरत फिरत एवढ्या दूर चालत गेले की एवढ्या खोल विचारात हरवले होते कुटुंबाच्या व्यवसायाचे त्यांच्या डोक्यात पन्नास विचार चालू होते घरापासून एवढ्या लांब कधी आले त्यांना माहितच नाही पडले
रस्त्याच्या कडेला एक पार होता त्यावर जाऊन बसले आरामात. बसले तेव्हा त्यांच्या लहानपणीची आठवण येऊ लागली तेव्हा ते संघर्ष करत होते जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं ते सगळे दिवस त्यांना आठवू लागले ते विचारात होते तेव्हा तिथे एक कुत्रा आला त्यांची एक चप्पल तोंडात धरून पळू लागला शेठजीने पाहिले तेव्हा पटकन त्याच्याकडून आपली चप्पल घेण्यासाठी त्याच्यामागे पळू लागले,
नक्की वाचा:“दोन मौल्यवान हिरे”