जर मनात पक्क केलं की उंचच उंच उडायचं तर मग तेव्हा आकाशाची उंची मोजणे व्यर्थ आहे.
एकदा एका बेटावर एक शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्यासमोर एक समस्या होती त्याचे मोठे शेत होते परंतु त्यात काम करण्यासाठी मजूर मिळत नव्हते जसे मजुर येत तसेच ते पळूनही जात ,कारण त्या बेटावर जोरजोरात हवा तसेच वादळ येत असत कधी पण तुफान येत असत तेव्हा मजुरांना वाटत जेवढं काम केलं तेवढं सगळं बरबाद, त्या शेतकऱ्यालाही समजत नव्हतं की असा मजूर कुठून आणावा की जो मन लावून काम करेल शेतावर कायमचा टिकेल.
एक दिवस त्या शोधात तो गावाकडून शहराकडे गेला तिथे जाऊन एका पेपरमध्ये त्यांने जाहिरात दिली त्यात लिहिलं की मजुराची आवश्यकता आहे हे वाचून खूप सारे मजूर आले परंतु जेव्हा परिस्थिती त्यांना समजायची तेव्हा ते मजूर शेतकऱ्याला हात जोडून निघून जायचे शेतकऱ्याला कळत नव्हतं नेमकं काय करावे.
एक दिवस एक मुलगा आला आणि तो म्हणाला की तुमच्याकडे काम करण्यास मी तयार आहे शेतकऱ्यांने त्या मुलाला वरपासून खालपर्यंत पाहिले हडकुळा मध्यमसा मुलगा होता तो बघून शेतकरी त्याला म्हणाला की तू काम नाही करू शकत खूप मेहनतीची गरज आहे माझ्या शेतावर मुलाने म्हटले “मी काम करीन त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त माझी एक अट आहे ती तुम्हाला मान्य करावी लागेल”
शेतकऱ्यांने म्हटले सांग काय अट आहे त्या मुलाने म्हटले जेव्हा हवा चालते तेव्हा मी झोपतो मला डिस्टर्ब करू नका शेतकरी म्हणाला काय विचित्र प्रकारचा माणूस आहे परंतु त्याच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे त्याने त्याची अट मान्य केली आणि त्याने त्या मुलाला कामावर ठेवून घेतले पुढच्या दिवसापासून त्या मुलाने कामास सुरुवात केली खूपच मेहनती निघाला तो मुलगा सकाळ
ते संध्याकाळ काम करायचा त्यामुळे शेतकरी खूप खुश होता त्याच्यावर त्याला वाटत होतं हा मुलगा खूप चांगलं काम करत आहे.
एक दिवस रात्रीचे दहा वाजले होते तेव्हा जोरजोरात हवा सुरू झाली आणि त्या शेतकऱ्याला आपल्या अनुभवाने वाटले की आता वादळ तुफान येणार आहे शेतकरी हातात कंदील घेऊन पळत त्या मजुराच्या झोपडीच्या दिशेने गेला जाऊन दरवाजा जोरजोरात वाजवू लागला आणि म्हणाला अरे उठ तुफान येणार आहे चल लवकर शेताकडे जाऊन बघुयात काय परिस्थिती आहे त्यावर त्या मुलाने आतून म्हटले की मालक मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जेव्हा तुफान येईल तेव्हा मी निवांतपणे झोपेल मला डिस्टर्ब करू नका हे ऐकून शेतकऱ्याला खूप राग आला त्याला वाटले की आता काय करावं मजुराला तर गोळीच घालावी असं त्याला वाटत होतं शेतकरी म्हटला याच्याशी आपण नंतर भांडू आधी शेतात जाऊन बघूयात काय झालं ते.
नक्की वाचा:“२०० अब्ज डॉलरचं स्वप्न पाहणारा मायकल डेल”
तो शेताकडे पळत पळत गेला आणि तिथे जाऊन बघतो तर काय तिथलं दृश्य काहीतरी वेगळंच होतं जे त्याचं निघालेले पीक होतं ते व्यवस्थितपणे बांधून ठेवलं होतं त्याची गाय, बैल ,जनावरं व्यवस्थित गोठ्यामध्ये बांधलेली होती, कोंबड्या खुराड्यात कोंडलेल्या होत्या दरवाजा वगैरे सर्व काही व्यवस्थित बांधलेलं होतं सर्व काही व्यवस्थितच होतं कितीही हवा आली तरी काहीही बिघडणार नव्हतं तेव्हा त्या शेतकऱ्याला त्या मुलाची अट आठवली जी त्याने ठेवली होती की जेव्हा हवा चालेल तेव्हा मी झोपेन.
नक्की वाचा:“जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म “