“जीवनात आनंद मागून भेटत नाही तर त्या आनंदाची इच्छा केली तरच तो मिळू शकतो.”
एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला आणि जेव्हा पण तो जंगलात शिकारीसाठी जायचा तेव्हा त्याच्यासोबत सैनिक तर असायचेच पण त्यांचा एक लाडका हत्ती असायचा जो हत्ती म्हणजे त्यांचा जीव होता त्या हत्तीच नाव होतं “बाला”
शिकारीसाठी राजा जेव्हा जंगलात दिवसभर फिरला तेव्हा त्याला कोणतीच शिकार भेटली नाही दिवसभर फिरून फिरून संध्याकाळ झाली आणि त्यांन विचार केला की आता रात्र झाली आहे आता आपण आराम करूयात आणि सकाळी परत शिकारीला लागूयात आणि हत्तीला सोबत ते एवढ्यासाठी घेऊन जात होते की केलेली शिकार हत्तीवर टाकून घेऊन येता यावी म्हणून ,
दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे सैनिक हत्तीला घेऊन आंघोळीसाठी गेले आणि आंघोळ करता करता तो हत्ती दलदलीत फसला सैनिकांनी हत्तीला दलदलीतून बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले परंतु तो काही केल्या बाहेर येत नव्हता घाबरलेले सैनिक राजाकडे परत निघून आले,
आणि राजाला उठवून म्हणू लागले राजासाहेब आमच्याकडून मोठी चूक झाली आम्ही बालाला आंघोळीसाठी घेऊन गेलो होतो परंतु आंघोळ करता करता तो तिथल्या दलदलीत अडकून पडला आहे आम्ही खूप प्रयत्न केले त्याला बाहेर काढण्याचा, परंतु काहीच फायदा होत नाही आता तुम्हीच सांगा राजासाहेब यावर काय उपाय केला जावा बालाचा जीव त्यात अडकला आहे.
नक्की वाचा:“आयुष्यात प्रगती हवी असेल तर शिकणं महत्वाचं आहे “